२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४४९ कुटुंबे राहतात. एकूण २२६० लोकसंख्येपैकी ११३६ पुरुष तर ११२४ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.